Foundation background
संस्थेची ओळख

संस्थेची ओळख

दान नाही, तर सन्मान — वंचित आणि उपेक्षित व्यक्तीला पुन्हा उभे करणारे पुनर्वसन, सक्षमीकरण आणि सामाजिक पुनर्एकीकरण यांचे अभियान.

आमची सुरुवात

संस्थापना घोषणापत्र

"माणूस बदलला तर समाज बदलेल; समाज बदलला तर राष्ट्र महान होईल."

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार प्रदान करते. तरीही वास्तवात समाजातील अनेक घटक आजही उपेक्षा, तिरस्कार, असुरक्षितता, गरिबी, व्यसन, मानसिक वेदना, सामाजिक बहिष्कार आणि संधींच्या अभावामुळे मुख्य प्रवाहापासून दूर राहण्यास भाग पडतात.

आमचा ठाम विश्वास आहे की कोणताही माणूस जन्मतः गुन्हेगार, व्यसनी, भिकारी किंवा समाजबाह्य नसतो; परिस्थिती, गरिबी, शोषण, अज्ञान, मानसिक आघात आणि सामाजिक उदासीनता यामुळे अनेकांना त्या अवस्थेत ढकलले जाते.

म्हणूनच आम्ही केवळ मदत करण्यासाठी नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी आणि त्याला स्वावलंबी, आत्मविश्वासू व समाजाच्या मुख्य प्रवाहातील जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यासाठी ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प करीत आहोत.

भारतीय संविधान

संविधान आणि प्रकाश

न्याय, समता, आणि अंधारात आशेचा मार्ग दाखवणारा दिवा

प्रेरणेची ज्योत

संस्थापकांचे प्रेरणास्थान आणि मानवतेची सेवा

संत, समाजसुधारक आणि संविधान — आमच्या वाटचालीचे तीन स्तंभ

आमची प्रेरणा

प्रस्तावना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ जानेवारी १९५० रोजी भारताला दिलेल्या समानतावादी, न्यायनिष्ठ आणि मानवकेंद्रित संविधानामुळे भारतीय समाजात सामाजिक परिवर्तनाची नवीन पहाट उगवली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान केला. त्यातून अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला.

हे परिवर्तन एका दिवसात घडलेले नाही. वारकरी संतपरंपरा, संत कबीर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशा असंख्य समाजसुधारकांच्या अथक कार्य, त्याग आणि विचारांमुळे समाजमनात समतेची आणि मानवतेची ज्योत प्रज्वलित झाली.

तथापि, आजही समाजातील काही घटक सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत:

देहव्यवसायात अडकलेल्या महिला व त्यांची मुले, लैंगिक अत्याचारग्रस्त महिला, तृतीयपंथीय व्यक्ती, समलैंगिक समाज, भिक्षेकरी, अनाथ व निराधार बालके, पाल्यांकडून दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिक, एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती, व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत असलेले नागरिक, कारागृहातून मुक्त झालेल्या व्यक्ती तसेच इतर सामाजिकदृष्ट्या वंचित घटक.

या सर्व घटकांना केवळ मदत नव्हे, तर सन्मान, पुनर्वसन, शिक्षण, संशोधन, सामाजिक पुनर्एकीकरण आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. याच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आणि मानवतेला सर्वोच्च स्थान देण्याच्या उद्देशाने "गंगा हरजीवनदास रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च फाउंडेशन, नाशिक" या संस्थेची स्थापना करण्यात येत आहे.

या संस्थेचे ध्येय केवळ सेवाभावापुरते मर्यादित नसून, संशोधनाधिष्ठित सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, वंचितांना न्याय, समान संधी आणि सन्मानाचे जीवन प्राप्त करून देणे तसेच प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वाभिमानाने स्थान मिळवून देणे हे आहे.

आमचे ध्येय

प्रत्येक वंचित, उपेक्षित, पीडित आणि संकटग्रस्त व्यक्तीला सुरक्षितता, सन्मान, उपचार, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार, स्वावलंबन आणि नवजीवनाची संधी उपलब्ध करून देणे.

सेवेचे व्याप

आमची कार्यक्षेत्रे

ही संस्था पुढील समाजघटकांसाठी सर्वसमावेशक पद्धतीने कार्य करेल…

देहव्यवसायात कार्यरत महिला व त्यांची मुले लैंगिक शोषण, मानवी तस्करी किंवा जबरदस्तीने देहव्यवसायात ढकललेल्या व्यक्ती गिगोलो म्हणून कार्य करणारे व लैंगिक शोषणाला बळी पडलेले पुरुष एलजीबीटीक्यूआयए+ समाजबांधव जन्मतः HIV बाधित मुले तसेच HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्ती भिक्षावृत्ती करणारे नागरिक दिव्यांग व्यक्ती गतीमंद मुले परित्यक्ता, विधवा व एकल माता अनाथ, निराधार व रस्त्यावरची मुले पाल्यांनी सांभाळण्यास नाकार दिलेले ज्येष्ठ नागरिक प्रकल्प ग्रस्त व बेघर कुटुंबे मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त व्यक्ती व्यसनाधीन युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मद्य, अंमली पदार्थ, तंबाखू तसेच इतर कोणत्याही व्यसनाच्या विळख्यात अडकलेले नागरिक निवृत्त लोककलावंत देवदासी
प्रमुख उपक्रम

व्यसनमुक्ती व पुनर्वसन अभियान

आमच्या संस्थेचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे व्यसनमुक्ती आणि संपूर्ण पुनर्वसन.

आम्ही व्यसनाकडे गुन्हा म्हणून नव्हे, तर उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची गरज असलेली वैद्यकीय व सामाजिक समस्या म्हणून पाहतो.

०१

आधुनिक व्यसनमुक्ती केंद्रे उभारू

०२

निवासी पुनर्वसन केंद्रे (Residential Rehabilitation Centres) सुरू करू

०३

मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करू

०४

विषहरण (Detoxification) पासून दीर्घकालीन पुनर्प्राप्ती (Long-term Recovery) पर्यंत संपूर्ण उपचार प्रणाली विकसित करू

०५

योग, ध्यान, अध्यात्म, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाद्वारे मानसिक बळ निर्माण करू

०६

व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ

०७

त्यांच्या कुटुंबाचे कौटुंबिक समुपदेशन (Family Counselling) करून नातेसंबंध पुन्हा उभे करू

०८

शाळा, महाविद्यालये, उद्योग आणि ग्रामीण भागात व्यापक व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबवू

०९

सातत्यपूर्ण पाठपुरावा (Follow-up) आणि समुदायीक सहाय्य (Community Support) निर्माण करून व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना समाजात पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देऊ

"आमचे ध्येय केवळ व्यसन सोडवणे नाही, तर आयुष्य पुन्हा घडवणे आहे."

आमचे प्रमुख उपक्रम

समाजातील विविध वंचित घटकांसाठी सर्वसमावेशक, संशोधनाधिष्ठित उपक्रम

मोफत वैद्यकीय सेवा

मोफत वैद्यकीय सेवा

ग्रामीण व शहरी भागात मोफत तपासणी शिबिरे, औषधोपचार व रेफर सेवा.

मानसिक आरोग्य व समुपदेशन

मानसिक आरोग्य व समुपदेशन

व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांद्वारे व्यक्तिगत आणि गट समुपदेशन.

शैक्षणिक शिष्यवृत्ती

शैक्षणिक शिष्यवृत्ती

वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, पुस्तके व मार्गदर्शन.

कायदेशीर सहाय्य

कायदेशीर सहाय्य

कायदेशीर सल्ला, दस्तऐवजीकरण व न्यायालयीन मदत.

करुणा – स्वावलंबन

आमची मूल्ये

प्रत्येक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर असलेली बारा मूल्ये.

माणुसकी
समानता
मानवी प्रतिष्ठा
संविधाननिष्ठा
सामाजिक न्याय
करुणा
सेवा
पारदर्शकता
उत्तरदायित्व
धर्मनिरपेक्षता
वैज्ञानिक दृष्टिकोन
स्वावलंबन
आमची प्रतिज्ञा

आम्ही कोणत्याही व्यक्तीकडे तिची जात, धर्म, भाषा, लिंग, लैंगिक ओळख, आर्थिक स्थिती, व्यवसाय, आरोग्यस्थिती किंवा भूतकाळ पाहून कधीही भेदभाव करणार नाही.

आमच्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रथम "माणूस" आहे.

सहप्रवासाचे आमंत्रण

आमचे आवाहन

या अभियानासाठी आम्हाला केवळ देणगीदार नकोत; आम्हाला सहप्रवासी हवेत.

तुमचा वेळ, तुमचे ज्ञान, तुमचे कौशल्य, तुमचा अनुभव आणि तुमची संवेदनशीलता — यांपैकी कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.

या चळवळीचा भाग होऊ शकतात:

डॉक्टर वकील मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशक समाजसेवक शिक्षक उद्योगपती उद्योजक पत्रकार कलाकार निवृत्त अधिकारी विद्यार्थी स्वयंसेवक CSR संस्था संशोधक प्रामाणिक इच्छा असलेला प्रत्येक नागरिक
आमचा संकल्प

एक चळवळ, एक संकल्प

कोणताही माणूस तिरस्काराचा नाही.

कोणताही जीव निरुपयोगी नाही.

कोणताही भूतकाळ अंतिम नाही.

प्रत्येकाला दुसरी संधी मिळायलाच हवी.

चला, आपण अशी चळवळ उभी करूया जिथे दानापेक्षा सन्मान, सहानुभूतीपेक्षा सक्षमीकरण आणि उपकारापेक्षा समानतेला अधिक महत्त्व असेल.

"सेवा हीच मानवतेची सर्वोच्च साधना."

॥ संविधान ॥

भारत

स्वातंत्र्य | समता | बंधुता | प्रतिष्ठा

सत्यमेव जयते

सहभागासाठी संपर्क

चळवळीचा भाग व्हा

या संस्थेच्या स्थापनेत, नोंदणी प्रक्रियेत, नियोजनात किंवा भविष्यातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याची इच्छा असलेल्या सर्व संवेदनशील नागरिकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

कार्यालयाचा पत्ता

'निमगाव हाऊस'
गणेश नगर, जिओ बीपी पंप समोर,
गुलमोहर विहार,
स्व. सितामाई सावळीराम काळे मार्ग,
सातपूर, नाशिक - ४२२ ००७.

संपर्क

QR कोड

QR CODE
येथे

संपर्कासाठी QR कोड स्कॅन करा

"समाज बदलण्यासाठी मोठ्या भाषणांची गरज नसते, तर एका माणसाचा हात धरून त्याला पुन्हा उभे करण्याची गरज असते. ही संस्था केवळ मदतीची नाही, तर आशा, विश्वास आणि एकप्रकारच्या पुनर्जन्माची चळवळ आहे…"

— डॉ. अद्वय प्रशांत हिरे-पाटील

मुख्य प्रवर्तक

गंगा हरजीवनदास रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च फाउंडेशन, नाशिक

॥ प्रत्येक जीवनाला सन्मान, प्रत्येकाला नव्याने जगण्याची संधी ॥